Tuesday, 24 March 2020

दिवसभराच्या चुका चा परिणाम


बऱ्याचदा धावपळीमुळे आपल्याकडून दिवसभरात अनेक चुका होत असतात. या चुकांचा परिणाम नकळत आपल्या मनावर, शरीरावर होत असतोच पण आपल्या अपयशामध्ये अशा चुकांचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे आज आपण अशा कोणत्या चुकीच्या गोष्टी करतो? त्याचा थोडा विचार करूयात...

कामासाठी झोपेचा बळी देत असाल तर चूक करताय. कारण दिवसभर काम केल्यानंतर थकवा येणे साहजिक आहे. अशात तुमच्या कामाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.

कामाच्यामध्येच अचानक काही लक्षात आले की तुम्ही सर्च करायला लागता. अशातच तुमचा खूप वेळ व्यर्थ जातो.

ब्रेकफास्ट टाळून आपल्याला वाटते की, आपण वेळ वाचवला पण याने एनर्जी कमी होते. सकाळी योग्य आहार घेतला नाही तर दिवसभर आपण पाहिजे तेवढे आउटपुट देऊ शकत नाही.

अरे यार! हे करायचे तर होते पण चल संध्याकाळी नक्की करेन किंवा उद्या तर कन्फर्म. अशाच गोष्टी आपल्याला अपयशाकडे घेऊन जातात.

प्रत्येक पाच मिनिटाने सोशल मीडिया चेक करायचा की, कोणाचा मेसेज किंवा इमेल तर नाही ना आला. अशामुळे आपण दिवसभरात किमान 2 तास तरी वाया घालवतो.

अनावश्यक मीटिंगमध्ये अधिक वेळ वाया घालवणे यासारखी दुसरी वाईट गोष्ट कोणतीच नाही.

रिसर्च सांगतो की, एका वेळी अनेक काम करण्याची क्षमता केवळ 2 टक्के लोकांमध्ये असते. त्यामुळे एका वेळेस एकच काम करा आणि असे करा की सर्व बघत राहतील.

जर आपल्या हे माहीत नसेल की कोणते काम आधी करायचे आहे? तर आपण वेळ वाया घालवत आहात. त्यामुळे प्राधान्य ठरवून कामे करा

स्टिव्ह जॉब्स यांच्या यशाचे सिक्रेट नियम 😁


अफाट कल्पनाशक्ती अपार कष्ट या जोरावर जगात स्वतःचा वेगळाच ठसा उमटवणाऱ्या स्टिव्ह जॉब्स यांच्या यशाचे सिक्रेट नियम जाणून घ्या...

1) तेच करा जे तुम्हाला करायला आवडते. ("Do what you love to do. The only way to do great work is to love what you Do")

2) वेगळे विचार करा. (Better Be a pirate than to join navy. Be different)

3) पहिले पाऊल टाका. (Sometimes the first step is hardest one. Just take it. Have the courage to follow your heart and intuition)

4) सुरुवात लहान करा पण ध्येय मोठे ठेवा. (Don't worry about too many things at once, just concentrate on one thing, start small, think big)

5) नेहमी शिकत रहा. (Learn continually)

6) भाऊ गर्दीत स्वतःचा आवाज दाबू नका. (Don't let the noise of other's opinion drown out your own inner voice)

7) फक्त पैशांसाठी काम करू नका. (Don’t do it for money)

8) दुसऱ्याचे आयुष्य जगू नका. (Don’t live someone else’s life)

9) अनुकरण नका नेतृत्व करा. (Innovation distinguishes between a leader and a follow)

10) कधीच संतुष्ट होऊ नका. (stay hungry, Stay foolish)

ध्यान (Meditation)

🙏 ध्यान म्हणजे काय? 🙏
ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्या अस्वस्थ मनाला शांत करणे !
त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो !
ध्यानाची पध्दत अगदी सोपी आहे.
डोळे बंद करा आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर रहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते, त्यामुळे त्यातून आत्मशक्ति, ऊर्जा जपली जाते, जी चांगले आरोग्य,मनःशांती जीवनाच्या विवेक-ज्ञानाकडे नेते.

🔔 ध्यानाचे फायदे 🔔
आध्यात्मिक स्वास्थ्य हे मुळ आहे आणि शारीरिक आरोग्य हे फळ आहे.
ध्यान हे आपल्या स्वत:च्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षिस आहे ! आपण आपल्या स्वत:ला खूप काही देऊ शकतो !

🌳 ताबडतोब बरे होणे 🌳
सर्व शारीरिक पिडा या मानसिक काळज्यांमुळे होतात. सर्व मानसिक काळज्या बौध्दिक अपरिपक्वपणामुळे निर्माण होतात. बौध्दिक परिपक्वता ही आध्यात्मिक उर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्याकारणाने येते. ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक उर्जा आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते, तेव्हा बुध्दीमत्ता पूर्ण विकसित होते, लवकरच सर्व मानसिक चिंता संपतात. परिणामस्वरूप सर्व शारीरिक आजार नाहीसे होतात. सर्व आजार बरे करण्याचा ध्यान हाच एक मार्ग आहे. पूर्वी केलेल्या वाईट कर्मांमुळे रोग होत असतात. दुष्कृत्यांचे निराकारण झाल्याविना रोग नाहिसे होणार नाहीत. दुष्कृत्यांचे परिमार्जन होण्यासाठी कोणत्याही औषधांचा उपयोग होणार नाही.

🌳 स्मरणशक्ती वाढते 🌳
ध्यानातून मिळविलेली भरपूर आध्यात्मिक उर्जा मेंदूला उत्तम प्रकारे जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते. ध्यानाने स्मरणशक्ति जबरदस्त वाढते म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी ध्यान नितांत आवश्यक आहे. शाळा आणि विद्यापीठ या दोन्ही पातळ्यांवर...........
🔔 वाईट सवयी नष्ट होतात 🔔
खूप खाणे, जास्त झोपणे, खूप बोलणे, अती विचार करणे, अती मद्यपान करणे, तंबाखू खाणे, . अनेक वाईट सवयी असतात. ध्यान करून मिळवलेले भरपूर विवेकज्ञान आणि आध्यात्मि्क ऊर्जा यामुळे सर्व वाईट सवयी आपोआप सुटतात.

👌 मन आनंदी होते 👌
कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्य हे पराभव, अपमान आणि वेदना यांनी पूर्ण भरलेले असते. तथापि आध्यात्मिक ज्ञान नि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केलेल्या व्यक्तींचे जीवन सर्व पराभव, अपमान आणि वेदना असूनही नेहमी शांत आनंदी असते.

🍁 कार्यक्षमता वाढते 🍁
भरपूर आध्यात्मिक उर्जा आणि आध्यात्मिक विवेकज्ञान यांच्या अस्तित्वाने सर्व कामे, मग ती शारीरिक असोत वा मानसिक, अधिक कार्यक्षमतेने केली जातात. थोड्या वेळात जास्त कामे पूर्ण होतात. किमान साधने वापरून कौतुकास्पद कामे केली जातात.

🙏 झोपेचे तास कमी होतात 🙏
ध्यानाने मुबलक आध्यात्मिक उर्जा मिळविली जाते. त्यामानाने झोपेत फक्त काही अंश-फार कमी ऊर्जा मिळते. शरीराला मिळणारी विश्रांती आणि मनाला मिळणारी ऊर्जा यांचा विचार करता अर्ध्या तासाचे सखोल ध्यान हे सहा तासांच्या झोपेबरोबरचे असते.

🍁 दर्जेदार नातेसंबंध 🍁
आध्यात्मिक विवेक, ज्ञानाची कमतरता हेच परस्पर संबंध इतके समाधानकारक दर्जेदार नसल्याचे एकमेव कारण आहे. आध्यात्मिक विवेकज्ञान प्राप्त झाल्याने परस्पर नातेसंबंध अतिशय दर्जेदार पूर्ण समाधानकारक होतात.

🍁 विचारशक्ती वाढते 🍁
आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी विचारांमध्ये शक्तींची गरज असते. मनाच्या अस्वस्थ अवस्थेत निर्माण होणारे विचार किमान शक्तीचे असतात. त्यामुळे ते आपापल्या लक्ष्यापर्यंत पोहोचत नाहीत. तथापि मन शांत असलेल्या स्थितीत विचार मोठी शक्ति मिळवितात आणि सर्व इच्छा नाटयपूर्ण रितीने प्रत्यक्षात येतात.

🙏 जीवनाचा उद्देश 🙏
आपण सर्व जन्म घेतो तो विशिष्ट हेतू ठेऊन, विशेष कामाकरीता, विशिष्ट रचना विशिष्ट योजनेसह. हे फक्त आध्यात्मिकतेने परिपक्व झालेले लोकच समजू शकतात त्यांच्या जीवनाचा विशिष्ट हेतू, विशेष कार्य, रचना आणि योजना जाणून घेऊ शकतात.

🙏 ध्यान (Meditation) कसे करावे? 🍁
. शांत, निवांत खोली निवडावी.
. मंद प्रकाश योजना असल्यास उत्तम. भगभगीत प्रकाश नसावा. मंद वासाची उदबत्ती लावल्यास वातावरणनिर्मिती उत्तम होते. परंतु धुराची एलर्जी असल्यास वा अस्थमाचा त्रास असल्यास उदबत्ती टाळणे योग्य.
. सुखासन वा स्वस्तिकासनासारख्या सुखकारक आसनात बसावे. आरामखुर्चीत बसले तरी चालेल. १० ते १५ मिनिटे बसता येणे हीच आवश्यकता आहे. सुखासन वा स्वस्तिकासनात बसल्यास हात गुढघ्यावर सैल ठेवावेत. पद्ममुद्रेप्रमाणे एका हाताचा तळवा दुसऱ्या हाताच्या ओंजळीत, अग्रबाहू मांडीवर स्थित (आधारासाठी) अकृत्रिमपणे सरळ बसावे. हे शक्य नसेल तर आराम खुर्चीत बसले तरी चालेल. हात खुर्चीच्या हातावर सैलसर ठेवावेत. शरीराची थोडीफार हालचाल चालते, पण मध्येच उठावयास लागल्यास मेडीटेशनचा भंग होतो,म्हणून खबरदारी घ्यावी.
. शवासनात आपण पायाकडून डोक्यापर्यंत शरीर शिथिल करतो. इथे मात्रत्याविरुद्ध म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत अवयव एकामागून एक असे शिथिल करीत जावे.
. सुखेनैव आसनस्थित झाल्यावर डोळे मिटून घेऊन वर सांगितल्याप्रमाणे डोक्यापासून पायापर्यंत अवयव एकामागून एक अवयव आठवून क्रमाने शिथिल करीत जावे. कपाळ, कान, गाल, मान, पाठ ते नितंबापर्यंत, त्यानंतर गळ्यापासून ते पोटापर्यंत, नंतर हात पाय असा क्रम ठेवावा. पोटाचा विचार करताना श्वासाचा विचार अवश्य करावा. ह्या सर्व प्रकाराला एक ते दीड वा जास्तीत ज्यास्त दोन मिनिटे पुरे होतात.
. आता आपण साक्षीभवनेने (Witnessing the mind) अभ्यास करावा. या योगे मन शांत रहाते त्याचा अनुभव घ्यावा.
. आपण सुखकारक स्थितीत असलो तरी शवासनस्थ नसल्यामुळे झोप लागण्याची शक्यता कमी असते. परंतु सवयीच्या अभावामुळे १५ मिनिटात चुळबुळ होतेच वा पायांना मुंग्या आल्यासारखे वाटते. अन्यथा वेळ समजण्यासाठी घड्याळाचा गजर लावण्यास हरकत नाही.
. सावकाश डोळे उघडावे. हातापायाची जाणीवपूर्वक हालचाल करावी. उत्तम मेडीटेशन जमल्यास रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते हृदयाचे ठोकेही मंद होतात. म्हणून मेडीटेशन मधून सावकाश बाहेर येत उभे रहाणे श्रेयस्कर होय.

🔔 ध्यान का करावे?

ध्यानामध्ये काय ताकद आहे?
सामुहिक ध्यान साधनेचे महत्व काय आहे?
🔔 जेव्हां १०० लोक एकत्रितपणे साधना करतात तेंव्हा त्यांच्या लहरी जवळजवळ कि.मी. पर्यंत पसरतात आणि नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात.
🔔 आइन्स्टाईनने शास्त्रीय दृष्टिकोनातुन सांगितले आहे की एका अणुचे विघटन केल्यास तो त्याच्या शेजारील अनेक अणूंचे विघटन करतो. त्यालाच आपण अणुविस्फ़ोट म्हणतो.
🔔 हीच गोष्ट आपल्या ऋषी-मुनीनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी सांगितली आहे की पृथ्वीवरील केवळ % लोकच ध्यान करतात, त्याचा फायदा उर्वरीत ९६% लोकांना होतो. आपणसुद्धा जर ९० दिवस सलग ध्यान केले तर आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम आपल्यास दिसून येईल. जर पृथ्वीवरील केवळ १०% लोक ध्यान करतील तर पृथ्वीवरील सर्व समस्या नष्ट करण्याची ताकद ध्यानामध्ये आहे.
🔔 महर्षी महेश योगी यांनी १९९३ मध्ये शास्त्रज्ञांपुढे हे सिद्ध केले आहे. त्यांनी ४००० शिक्षकांना वॉशिंग्टन डी सी मध्ये बोलावून त्यांना एक महिना ध्यानाभ्यास करावयास सांगितले. त्यामुळे त्या शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण ५०टक्क्यांनी कमी झाले. शास्त्रज्ञाना याचे कारण कळले नाही म्हणुन त्यांनी याला "महर्षी इफेक्ट" असे नाव दिले. ध्यानामधील ही ताकद आहे.
🔔 आपण आपली भौतिक तसेच अध्यात्मिक प्रगती ध्यानामुळे कमी श्रमात साधु शकतो. गरज आहे ती फक्त ध्यानातून स्वत:चा शोध घेण्याची.
!! सबका मंगल हो !!
!! सबका कल्याण हो !!
!! सबकी स्वस्थ मुक्ति हो !!