Tuesday, 24 March 2020

स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायक विचार !

उठा, जागे व्हा ! जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत थांबू नका !

ध्येयासाठी जगणे, हे ध्येयासाठी मरण्यापेक्षा कठीण आहे. कार्यशक्ती आणि इच्छाशक्ती प्राप्त करा. खडतर परिश्रम करा. म्हणजे तुम्ही निश्चित ध्येयाप्रत पोचू शकाल.

शक्यतेची सीमा जाणून घेण्यासाठी अशक्यतेच्या पुढे निघून जायला हवे.

सारी शक्ती तुमच्या आत दडलेली आहे. तुम्ही काहीही आणि सारे काही करू शकता.

सामर्थ्य हे जीवन आहे. तर दुर्बलता म्हणजे मृत्यू.

तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता. तुम्ही जर स्वत:ला दुर्बळ समजलात तर दुर्बळ बनाल आणि सामर्थ्यशाली समजलात तर सामर्थ्यशाली बनाल.

एक काम करत असताना एकच काम करा. आपले सर्वस्व त्यात अर्पण करा. इतर सारे काही विसरून जा.

दिवसभरातून एकदा तरी स्वत:शी संवाद साधा. तसे केले नाहीत तर तुम्ही या जगातील एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल.